Skip to main content

Jijau Srusti, Sindhkhedraja, Maharashtra |माँ साहेब जिजाऊ इतिहास.


जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.

आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.

Comments

Popular posts from this blog

The Secret Book - Rhonda Byrne | Summary in Hindi | द रहस्य बुक हिंदी समरी.

The Secret Book Summary in Hindi: आज दुनिया में सब कोई दुखी है पर इस दुखी जीवन में हमें खुश रहना है। लेकिन इस दुख भरी जीवन में खुश रहना असंभव है। दुख और सुख जीवन के दो पहलू हैं। दुख होगा तो सुख आएगा और सुख होगा तो दुख आएगा। जैसे दिन होती है तो रात अवश्य होगी, रात होती तो दिन होना तय है। वैसे ही हमारे जीवन में कई सारी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। परंतु कठिनाइयों को सामना करने के उपरांत एक ऐसा जीवन, एक ऐसा क्षण आता है जो हमारे जीवन में जो खुशी ला देता है।   हमें हमेशा खुश रहना चाहिए अर्थात हमें हमेशा पॉजिटिव रहना चाहिए। हमारे बड़े बुजुर्ग भी कहते थे कि हमेशा खुश रहो और मस्त रहो। ऐसे कई मोटिवेशनल स्पीकर भी हैं व ट्रेनर भी है, जो हमारे जीवन में दुखों को बुलाकर खुशी लाने का प्रयास करते हैं और हमें पॉजिटिव एनर्जी मिल जाती हैं। यदि हम जीवन में खुश रहते है तो हम अच्छे से अच्छे मुकाम को हासिल कर पाते हैं। ऐसे ही आज हम एक किताब के बारे में बात करने जा रहे हैं, जिसे पढ़कर आपको पॉजिटिव एनर्जी मिलेगी और आप उस मुकाम को हासिल कर पाएंगे, जो आप इच्छा करते हैं।   The Secret Boo...

BSNL 5G Service Release date

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑक्टोबरपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली जाणार आहे. त्यानंतर हळुहळू या सेवेचा विस्तार केला जाणार असल्याचे ‘रिलायन्स जिओ’कडून सांगण्यात आले आहे. देशातील खासगी टेलिकाॅम कंपन्या 5G सेवेची तयारी करीत असताना, सरकारी ‘बीएसएनएल’ आता कुठे 4G लाँच करीत आहे. सध्या ‘बीएसएनएल’ (BSNL) घरघर लागली असली, तरी आजही अन्य कंपन्यांच्या तुलनेत ‘बीएसएनएल’ची सेवा स्वस्त आहे. अशात एअरटेल (Airtel), जिओच्या (Jio) गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे. वर्षभरात सुरु होणार.. पुढील काही दिवसांतच ‘बीएसएनएल’चीही 5G सेवा सुरु केली जाणार आहे. खुद्द केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’च्या कार्यक्रमात ही घोषणा केली. गावाेगाव नेटवर्क असलेली ‘बीएसएनएल’ 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु करणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.. विशेष म्हणजे, अजून 4G सेवाही सुरु झालेली नसताना, ‘बीएसएनएल’ वर्षभरात 5G सेवेचे लक्ष्य कसे गाठणार, या प्रश्नावर मंत्री वैष्णव म्हणाले, की 4G वरून 5G...

Chatrapati Shivaji Maharaj Raigad Ford in Maharashtra.

 Raigad Fort : Raigad is a hill fort situated at about 25 Km from Mahad in the Raigad district. Chhatrapati Shivaji renovated this fort and made it his capital in 1674 AD. The rope-way facility is available at Raigad Fort, to reach at the fort from ground in few minutes. The fort also overlooks an artificial lake known as the ‘Ganga Sagar Lake’. The only main pathway to the fort passes through the “Maha Darwaja” (Huge Door). The King’s durbar inside the Raigad Fort has a replica of the original throne that faces the main doorway called the Nagarkhana Darwaja. This enclosure had been acoustically designed to aid hearing from the doorway to the throne. The fort has a famous bastion called “Hirakani Buruj” (Hirkani Bastion) constructed over a huge steep cliff. Forts in Raigad District