Skip to main content

Jijau Srusti, Sindhkhedraja, Maharashtra |माँ साहेब जिजाऊ इतिहास.


जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.

आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.

जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.

राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.

Comments

Popular posts from this blog

The Secret Book - Rhonda Byrne | Summary in Hindi | द रहस्य बुक हिंदी समरी.

The Secret Book Summary in Hindi: आज दुनिया में सब कोई दुखी है पर इस दुखी जीवन में हमें खुश रहना है। लेकिन इस दुख भरी जीवन में खुश रहना असंभव है। दुख और सुख जीवन के दो पहलू हैं। दुख होगा तो सुख आएगा और सुख होगा तो दुख आएगा। जैसे दिन होती है तो रात अवश्य होगी, रात होती तो दिन होना तय है। वैसे ही हमारे जीवन में कई सारी कठिनाइयों का सामना करना पड़ता है। परंतु कठिनाइयों को सामना करने के उपरांत एक ऐसा जीवन, एक ऐसा क्षण आता है जो हमारे जीवन में जो खुशी ला देता है।   हमें हमेशा खुश रहना चाहिए अर्थात हमें हमेशा पॉजिटिव रहना चाहिए। हमारे बड़े बुजुर्ग भी कहते थे कि हमेशा खुश रहो और मस्त रहो। ऐसे कई मोटिवेशनल स्पीकर भी हैं व ट्रेनर भी है, जो हमारे जीवन में दुखों को बुलाकर खुशी लाने का प्रयास करते हैं और हमें पॉजिटिव एनर्जी मिल जाती हैं। यदि हम जीवन में खुश रहते है तो हम अच्छे से अच्छे मुकाम को हासिल कर पाते हैं। ऐसे ही आज हम एक किताब के बारे में बात करने जा रहे हैं, जिसे पढ़कर आपको पॉजिटिव एनर्जी मिलेगी और आप उस मुकाम को हासिल कर पाएंगे, जो आप इच्छा करते हैं।   The Secret Boo...

12th Maharastra Boards 2022 Sample Paper pdf download | English Paper Pattern 2022 mh board.

For Full Paper Pdf Click Download ⬇️                             Download             Click -  @rushigaroleofficial

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!!

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!! VIRALब्रेकिंग.... ‘ आधार कार्ड ’.. प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. बँकेत खाते सुरु करायचं असो, वा गॅस सिलिंडरचे अनुदान हवं असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच.. बऱ्याचदा आधार कार्ड तयार करताना, नजरचूकीने काहीतरी राहून जाते.. कधी नाव चुकतं, कधी जन्मतारीख, कधी पत्ता, तर कधी मोबाईल नंबर..! शक्यतो आधार कार्ड काढताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. अर्थात, नंतर ही चूक दुरुस्तही करता येत होती. अर्थात, त्यासाठीही काही मर्यादा घालून दिल्या होत्या.. मात्र, आता आधार कार्ड अपडेट करणं अवघड होणार आहे.. कारण, ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) कडून आधार कार्डशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा फटका सगळ्याच आधार कार्डधारकांना बसणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. ‘ आधार’बाबत कोणत्या सेवा बंद..?   पत्ता प्रमाणीकरण पत्र ‘युआयडीएआय’कडून ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट क...